Tuesday, August 13, 2019

क्रीडा स्पर्धांमधील औपचारिकता


भाषनांशिवाय स्पर्धा!!!

कुठलीही क्रीडा स्पर्धा म्हटलं म्हणजे एक वेगळाच उत्साह व जोश असतो. क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळाडूंच्या दृष्टीनेतर एक पर्वणीच असते. त्यांनी केलेला सराव/अभ्यास याचं प्रदर्शन करण्याची मोठी संधी म्हणजे स्पर्धा. स्पर्धेच्या अगोदर चिंता, विरोधी संघातील कमकुवत दुवे याची चर्चा तर स्पर्धा संपल्यानंतर कोण कसे खेळले, कुणामुळे जिंकलो कुणामुळे हरलो याची चर्चा व विश्लेषणहोते. परंतु, स्पर्धांच्या ठिकाणी स्पर्धां शिवायही अनेक गोष्टी असतात,त्यातील महत्त्वाचे म्हणजे उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ. या दोन्ही कार्यक्रमांना पाहुण्यांची मोठी फौज तयारच असते. स्पर्धा किती वाजता आहे किंवा किती वाजता सुरू करावयाची आहे, याहीपेक्षा पाहुने आल्यानंतरच स्पर्धेला सुरुवात होते.त्यातच जर पाहूने आहे उशिरा आले तर सर्व खेळाडूंना उन्हातानात ताटकळत इच्छा नसताना थांबावच लागतं. त्यानंतरसुरु होतो तो म्हणजे स्पर्धेचा उद्घाटन समारंभ. आलेल्या पाहुण्यांचे, अध्यक्षांचे स्वागत, स्पर्धेचे प्रास्ताविक, प्रमुख पाहुण्यांचे भाषण, अध्यक्षांचे भाषण व आभार. कुठलीही स्पर्धा म्हटलं म्हणजे अशा प्रकारचीऔपचारिकता ही आलीच. स्पर्धेसाठी आलेले प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांना वाटतं की खेळाडू हे आपले भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर हे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष मोठ्या तावातावात सर्व खेळाडूंना उपदेशाचे डोस चालू करतात. खरंतर खेळाडूंना पाहुणे काय बोलत आहेत याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्यांचं एकाच गोष्टीकडे लक्ष लागलेलं असतं, ते म्हणजे मला मैदानात उतरून खेळायला कधी मिळेल. परंतु पाहुणे त्यांची ही इच्छा सहजासहजी पूर्ण होऊ देत नाही. कधीकधी प्रश्न पडतो की स्पर्धांमध्ये हा सगळा औपचारिक सोपस्कर आवश्यक आहेच का?

खरंतर स्पर्धांमध्ये खेळाडूंना खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त करून देणे, खेळाडू ज्या मैदानावर खेळणार आहेत ते मैदान चांगले असणे, खेळाडूंना स्वच्छ पाणी प्यायला मिळने, स्पर्धा चालू नसताना खेळाडूंना योग्य बसण्याची व्यवस्था असने, खेळाडूंना जर इजा झाली तर त्यांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध असणेया प्रमाणे स्पर्धा चालू ठेवणे दोन सामन्यांमध्ये योग्य अंतर असणेहे सर्व घटक कुठल्याही खेळासाठी व स्पर्धांसाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु स्थानिक पातळीवरील स्पर्धांमध्ये सर्व घटक दुर्लक्षित होताना दिसतात.

स्पर्धा संपल्यानंतर येतो तो बक्षीस वितरण समारंभ. ज्या ठिकाणी खेळाडूंचा गौरव करणे,जिंकलेल्या संघांना अथवा खेळाडूंना पारितोषिकाचे वितरण हे महत्त्वाचे असताना त्यामध्ये सुरुवात होते पुन्हा एकदा प्रास्ताविक, सत्कार, पाहुण्यांची ओळख,पाहुण्यांचे भाषण यासारख्या औपचारिक सोपस्काराची. उद्घाटन समारंभामध्येखेळाडू ज्याप्रमाणे  खेळण्यासाठी ताटकळत थांबलेले असतात आता खेळून झाल्यानंतर बक्षीस घेण्यासाठी परत एकदा ताटकळत बसलेले असतात. भाषनां शिवाय स्पर्धा होऊ शकणार नाहीत का? खरं तर स्पर्धा म्हणजे खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची एक पर्वणीच असते परंतु अशा या स्पर्धेच्या ठिकाणी कौशल्य पाहण्याऐवजी भाषनं ऐकण्याची वेळ सर्वांवर येते.

चला तर मग निश्चय करूया की क्रीडास्पर्धांमध्ये कमीत कमी औपचारिक कार्यक्रम करणे व खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी व सुविधा पुरावा या!

शरद आहेर 
फोन ९८९००२५२६६

भाई झाला सर !


भाई झाला सर !
काही वर्षांपूर्वी टीव्ही वर सत्यमेव जयते हा कार्यक्रम होता त्यामधील सत्यघटनेवर आधारित कथा आहे. नागपूरमधील एका झोपडपट्टीमध्ये अखिलेश नावाचा एक १४ वर्षाचा तरुण राहत होता.ज्याप्रमाणे इतर मुलांची वेगवेगळे स्वप्न व आवडीनिवडी असतात तसे अखिलेशचे स्वप्न म्हणजे भाई बनने म्हणजे, गुंड होणे. कुणालाही मारणे, धमकी देणे हे त्याचे स्वप्न व आवडते काम होते.अखिलेश ज्या भागात राहत होता त्या भागामध्ये एक महाविद्यालय होते. या महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक प्राध्यापक विजय बारसे हे होते. अखिलेश आणि त्याचे मित्र एक दिवस असेच महाविद्यालयाच्या आवारात टिंगलटवाळी करत असताना सरांनी त्यांना निरोप पाठविला की तुम्ही फुटबॉल खेळणार का? तर अखिलेशने सरांना विचारले की सर आम्ही फुटबॉल खेळल्यानंतर आम्हाला किती पैसे मिळणार?त्यावेळेस सर म्हटले की तुम्ही जर फुटबॉल खेळला तर मी प्रत्येकाला पाच-पाच रुपये देणार!त्यामुळे अखिलेश आणि त्यांचं टोळकं, फुटबॉल खेळायला तयार झाले. एक ते दीड तास मनसोक्तपणे फुटबॉल खेळले. खेळून झाल्यानंतर ते सरांकडे गेले आणि म्हणाले आम्हाला आमचे पैसे द्या. ठरल्याप्रमाणे सरांनी लगेच खिशातून पाच रुपये काढून त्या विद्यार्थ्यांच्या हातात दिले. उद्या आले तर उद्या परत पैसे मिळतील असे सरांनी सांगितले. त्यामुळे पैसे मिळणार म्हणून ते विद्यार्थी दुसऱ्या दिवशीही परत फुटबॉल खेळायला त्या सरांकडे गेले. अशाप्रकारे नियमितपणे दहा ते पंधरा दिवस ते विद्यार्थी फुटबॉल खेळण्यासाठी मैदानावर जात राहिले. सर दररोज ठरल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पाच-पाच रुपये देत राहिले. परंतु दहा पंधरा दिवस झाल्यानंतर एक दिवशी हे विद्यार्थी खेळायला गेल्यानंतर सर म्हणाले की आज माझ्याकडे पैसे नाही आज खेळू नका. परंतु इतके दिवस सातत्याने खेळल्यामुळे विद्यार्थ्यांचे मन तेथून जायला तयार होईना आणि म्हणून विद्यार्थी सरांना म्हणाले की सर आम्हाला आज पैसे नको पण फुटबॉल खेळू द्या. सरांनी त्यांना तशी परवानगी दिली. आता मात्र ते विद्यार्थी खेळायला येत होते पण सर त्यांना पैसे देत नव्हते.परंतु, काही दिवसानंतर सरांनी फुटबॉल देणेही बंद केले. परंतु आता या विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्याची आवड जडली होती. जे विद्यार्थी दारू पिणे, सिगारेट पिणे, गांजा पीने, इतरांना धमकावणे, मारणे या गोष्टींच्या आहारी गेलेले होते तेच विद्यार्थी आता हे सर्ववाईटकृत्य सोडून फुटबॉल च्या आहारी गेले होते.जितके दिवस ते विद्यार्थी फुटबॉल खेळत होते तितक्या दिवस त्या विद्यार्थ्यांनी दारू पिणे, गांजा पीने, धमकावणे, मारणे या कुठल्याही वाईट गोष्टी केल्या नव्हत्या. त्यानंतर एके दिवशी त्या विद्यार्थ्यांची व त्या भागातील इतर गुंडांची हाणामारी झाली या विद्यार्थ्यावर विरुद्ध टोळीने जीवघेणा हल्ला केला परंतु त्यातून कसाबसा हा विद्यार्थी निसटला व पळून गेलाव स्मशानामध्ये जाऊन लपला. कारण त्याला वाटले याठिकाणी आपल्याला कोणीही शोधायला येणार नाही.  काही दिवसांनी तो नियमितपणे आपल्या घरी राहू लागला. घराच्या बाहेर उभा असताना दोन तीन विद्यार्थी त्याच्या घरासमोरून फुटबॉल घेऊन मैदानावर खेळायला चालली होती आणि त्यावेळी अखिलेशला आपले जुने दिवस आठवले.अखिलेशत्या विद्यार्थ्यांच्या मागे मागे चालत फुटबॉलच्या मैदाना पर्यंत गेला. मैदानावर अनेक विद्यार्थी फुटबॉल खेळत होते.अखिलेश दुरून गाडीवर बसून ते सर्व दृश्य पाहत होता. तेवढ्यात त्या मैदानावर सर आले व सरांनी अखिलेशला ओळखले. कारण ते सर म्हणजे त्या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक प्राध्यापक विजय बारसे हेच होते. तेव्हा सरांनी त्याच्याकडे चौकशी केली की काय सध्या करतोय?तेव्हा अखिलेशने सांगितले की मी फुटबॉल सोडल्यानंतर परत गुंडगिरीची कामे चालू केलेली आहे व हलाखीच्या परिस्थितीत आहे. तेव्हा सर त्याला म्हणाले की तुला दिवसभरा मधील थोडा वेळ असेल तर मैदानावर येऊन मुलांबरोबर खेळत जा! तेव्हा प्राध्यापक विजय बारसे सरांनी त्या विद्यार्थ्याला सांगितले की, तुला या सर्व वाईट कामांपासून दूर जायचे असेल तर तू फुटबॉलच्या मैदानावर ये! कारण फुटबॉलच्या मैदानावर आल्यानंतर तुला असे काम करण्यास वेळही मिळणार नाही आणि डोक्यात विचारही येणार नाही.अशाप्रकारे तो विद्यार्थी आता परत एकदा फुटबॉलच्या मैदानावर येऊन इतर विद्यार्थ्यांबरोबर फुटबॉल खेळू लागला.काही दिवसांनी त्या मैदानावर स्लम सॉकर नावाच्या फुटबॉलच्या जिल्हास्तरीय स्पर्धा भरवण्यात आल्या, ज्यामध्ये गरीब व झोपडपट्टीतील विद्यार्थी सहभागी होतात. अशा या स्लम सॉकर जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अखिलेशने चांगली कामगिरी केली त्यामुळे त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धांसाठी झाली. राज्यस्तरीय स्पर्धेला निवड झाल्यामुळे अखिलेशचांगला सराव करू लागलाव प्रेरित झाला. राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही त्याने उत्तम कामगिरी केली आणि त्याचे फलित म्हणजे त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली.राष्ट्रीय स्पर्धांमधून भारतीय संघासाठी जी निवड केली जाते त्यामध्ये ही अखिलेशची निवड झाली.विशेष म्हणजे अखिलेश याची फक्त भारतीय संघातच निवड झाली नाही तर भारतीय संघाच्या कप्तानपदी त्याची निवड झाली. अखिलेश याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघब्राझील येथे स्लम साखर फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता.
अशाप्रकारे दारूपिणे, सिगारेटओढणे, गांजा पिणे, मारामारी अशी वाईट कृत्यं करणारा एक विद्यार्थी केवळ खेळामुळे काय करू शकतो आणि खेळामुळे त्याचे आयुष्य किती बदलू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अखिलेश होय.  अखिलेश एवढेच करून थांबला नाही तर सध्या तो अशाच झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांना फुटबॉलचे प्रशिक्षण देत आहे व तो ज्याप्रमाणे फुटबॉल मुळे बदलला तसेच बदल इतर विद्यार्थ्यांमध्ये करणयाचा प्रयत्न करत आहे.एक काळ असा होता की अखिलेश ला सर्व लोक भाई म्हणून ओळखत होते तोच अखिलेश आता फुटबॉलचा सर म्हणून ओळखला जाऊ लागला.
खेळामुळे पारितोषिके मिळतात, आरोग्य चांगले राहते हे ठीकच पण, खेळामुळे जिद्द, चिकाटी, सकारात्मकविचार, सहकर्यावृत्ती,प्रामाणिकपणा अशा जीवन जगण्यासाठी आवश्यक कितीतरी गुणांचा विकास खेळामुळे होतो. मी काहीही करू शकतो हा आत्मविश्वास खेळामुळे येतो. खेळ म्हणजे टाईमपास नसून आयुष्यभरासाठीची गुंतवणूक आहे हे विध्यार्थी व पालकांनी लक्षात घ्यावे. चला तर मग खेळूया!!!


शरदआहेर
प्राध्यापक, चंद्रशेखरआगाशेशारीरिकशिक्षण
महाविद्यालय, पुणे.

भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे?

 भिंती उंचावत आहेत... पण विश्वासाची उंची कमी होत आहे?  जगाच्या इतिहासात चीनची महान भिंत ही मानवी बुद्धिमत्तेचे आणि सामर्थ्याचे प्र...